Wednesday, February 23, 2011

किल्ले कावनई

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी 


किल्ले कावनई
इगतपुरी परिसरात असणारी सह्याद्रीची रांग दोन दिशांना विभागली जाते एक पूर्वेकडे तर दुसरी पश्चिमेकडे पूर्वेकडे असणा-या सह्याद्रीच्या रांगेला कळसूबाई रांग म्हणतात.यात कळसूबाई ,अलंग,कुलंग ,अवंढ - पट्टा हे किल्ले येतात तर पश्चिमेकडे असणा-या रांगेत त्रिंगलवाडी,कावनई ,हरीहर,ब्रम्हगिरी,अंजनेरी हे किल्ले येतात.या परिसरात भ्रमंती करायची असल्यास इगतपुरी किंवा घोटीला यावे.


गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : 
किल्ल्याचा दरवाजा आजही ब-यापैकी शाबूत आहे.दरवाज्यातून आत शिरल्यावर उजव्या हातालाच गुहा आहे.गुहेत ४ ते ५ जणांना राहता येईल एवढी वाट आहे.येथूनच माथ्यावर जाण्यास जागा आहे.गडमाथ्यावर पोहचल्यावर दक्षिणभागात एक तलाव आहे आजुबाजुला पडक्या वाडांचे अनेक अवशेष आहेत.गडाच्या पश्चिम भागात एक बुरुज आहे.बुरुजाच्या जवळच पाण्याचे टाके आहे.गडमाथा तसा लहानच त्यामुळे फिरण्यास अर्धा तास पुरतो.किल्ल्यावरून कळसूबाई रांग,त्र्यंबक रांग,त्रिंगलवाडी असा सर्व परिसर दिसतो.


गडावर जाण्याच्या वाटा : 
१.  कावनई मार्गे कावनई ला जायचे असल्यास इगतपुरीला किंवा घोटीला यावे.येथून कावनई गावाकडे जाणारी बस पकडावी.कावनई गाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.इगतपुरीहून अप्पर वैतरणा ला जाणारी बस पकडून वाकी फाटावर उतरावे. वैतरणा कडे जाणारा रस्ता सोडून उजवकडची वाट पकडावी.या फाटयापासून १ तासाच्या चाली नंतर आपण कावनई गावात पोहचतो.गावात कपिलाधारातीर्थचा नावाचा आश्रम आहे.गावात शिरल्यावर उजव्या हातालाच किल्ला दिसतो.किल्ल्याची एक सोंड गावात उतरलेली आहे.या सोंडेवरून चढत जायचे अर्ध्या तासाच्या चालीनंतर वाट उजवीकडे वळते आणि चिमणीपाशी येऊन थांबते.पुढचा चढाई चिमणीतूनच आहे.येथे सोपे प्रस्तरारोहण करून आपण किल्ल्याच्या दरवाजापाशी येऊन पोहचतो.गावापासून इथपर्यंत पोहचण्यास १ तास पुरतो.


राहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहे यात ४ ते ५ लोकांची राहण्याची सोय होते.

जेवणाची सोय : आपण स्वतः करावी

पाण्याची सोय : किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.यात एप्रिल पर्यंत पाणी असते.

जाण्यासाठी लागणारा वेळ : कावनई गावातून अर्धा तास.  


No comments:

Post a Comment