माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी
अंजनेरी हा नाशिक - त्र्यंबकेश्वर रांगेतील महत्वाचा किल्ला आहे. नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे.
)/10190E094B8E5F1DBC907D6A8DED43A036A98EDA72FFD9E0B9D01BA49ECE71083B18E7F212A1E796.file)
अंजनेरी हा नाशिक - त्र्यंबकेश्वर रांगेतील महत्वाचा किल्ला आहे. नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे.
इतिहास:
अंजनेरी किल्ला इतिहासात परिचित आहे तो हनुमान जन्मस्थानामुळे. पवनपुत्र हनुमानाचा जन्म याच डोंगरावर अंजनी मातेच्या पोटी झाला म्हणुनच या किल्ल्याला 'अंजनेरी' नाव देण्यात आले. याच डोंगराच्या परिसरात हनुमान लहानाचे मोठे झाले.येथे १०८ जैन लेणी सापडतात.
गडावरील ठिकाणे
अंजनेरी गावातून किल्ल्यावर येताच वाटेतच पायर्याच्या ठिकाणी गुहेत लेणी आढळतात. ही लेणी जैनधर्मीय असल्याचे दिसून येते. पठारावर पोहोचल्यावर १० मिनिटांतच अंजनी मातेचे मंदिर लागते. मंदिर बर्यापैकी प्रशस्त आहे. त्यामुळे मुक्काम करण्यास योग्य आहे. थोडे पुढे गेल्यानंतर दोन वाटा लागतात. एक डावीकडे सीता गुहेपाशी पोहोचते तर दुसरी समोरच्या बालेकिल्ल्यावर चढते. बालेकिल्ल्यावर अंजनी मातेचे दुसरे प्रशस्त मंदिर आहे. किल्ल्याचा घेर फार मोठा आहे. किल्ल्याच्या पठारावरुन वेतरणा,गंगापुर,मुकणे,दारणा,कश्यपी,गौतमी-गोदावरी धरणाचा विस्तार पाहण्यासारखे आहे.पठारावर १ तलाव आहे.
)/10190E094B8E5F1DBC907D6A8DED43A040B2AB15BFF9EF8A3BF21247BE954DAB18FA7529D89CD1AB.file)
गडावर जाण्याच्या वाटा
किल्ल्यावर जाण्याची मुख्य वाट अंजनेरी गावातून वर जाते. नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिक पासून २० कि.मी. अंतरावर अंजनेरी फाट्यावर उतरावे. या फाट्यापसुन १० मिनिटे अंतरावरील अंजनेरी या गावात पोहोचावे. गावातून नवरा - नवरीचे दोन सुळके नजरेस भरतात. गावातूनच एक प्रशस्त वाट किल्ल्यावर जाते. पुढे पायर्या लागतात. पायर्यांच्या साह्याने अंजनेरीच्या पठारावर पोहोचता येते. अंजनेरी गावापासून येथपर्यंत येण्यासाठी दिड तास पुरतो.
No comments:
Post a Comment